ग्रामीण कवी श्रीराम घडे यांची भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंचाच्या पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष पदी निवड

 *ग्रामीण कवी श्रीराम घडे यांची भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंचाच्या पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष पदी निवड*



ग्रामीण हास्य कवी म्हणून प्रसिद्ध असणारे ग्रामीण कवी श्रीराम विध्यासागर घडे यांची भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंचाच्या पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष पदी नुकतीच निवडकरण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे की, काव्यक्षेत्राची तसेच शेती मातीची जाण असणारे ,शेतकरी पुत्र ग्रामीण भागातून शहरात नोकरीच्या निमित्ताने शहरात येऊन आपला सांस्कृतिक वसा आणि शेतकऱ्याची व्यथा मांडणारे ,एकदम सोप्या शब्दात सर्वांना आपलेसे करणारे आणि आपल्या काव्यातून श्रोत्यांना खळखळून हसवणारे ग्रामीण हास्य कवी अशी महाराष्ट्र भर ओळख निर्माण करणारे ग्रामीण कवी , गीतकार, निर्माता अशा अनेक भूमिका निभावणारे तसेच स्वतः च्या आणि कवी आणि कवयित्री यांच्या कवितेला संगीत बद्ध करून सर्वांचे मनोरंजन करणारे कवी श्रीराम घडे सर यांची साहित्य कला, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील आवड पाहून, साहित्य क्षेत्रातीलविविध समस्या सोडवण्यासाठी , समूहासाठी वेळोवेळी दिलेले योगदान या बाबींचा विचार करून त्यांची  भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंचाच्या पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल संघटनेचे अध्यक्ष मा .विशाल शिरसट, उपाध्यक्ष विजय जायभाये, कार्याध्यक्षा शिल्पा मुसळे, कोषाध्यक्ष छाया देसले,सचिव ओंकार मेहेर, सहसचिव योगेश हर्णे आदीसह अनेकांनी अभिनंदन केले.





एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ